अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला मे.सुप्रीम कोर्टाचा धक्का. आता पुढ़चा मार्ग काय?

images – 2021-04-08T205832.347

प्रतिनिधी:-

मे.मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सी.बी.आय. चौकशीच्या विरोधात मे.सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला मे.सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे.

सी.बी.आय. चौकशीच्या मे.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मे.सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
अनिल देशमुख आणि राज्य सरकार यांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या.

मे. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्याने सी.बी.आय.चा चौकशी सुरु राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मे. सुप्रीम कोर्टाने यावेळी महाराष्ट्रातील मोठे अधिकारी या प्रकरणात गुंतले असल्याचा उल्लेख केला.
अनिल देशमुख यांची बाजू मांडणारे एड.कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना कायदा प्रत्येकासाठी समान असला पाहिजे.
फक्त एका पोलीस अधिकाऱ्याने काही म्हटलं म्हणून त्याचे शब्द पुरावा होत नाही असं म्हटलं.

यावर मे.सुप्रीम कोर्टाने आरोप करणारे तुमचे (अनिल देशमुख) शत्रू नव्हते,
पण आरोप अशा व्यक्तीने केले आहेत जो जवळपास तुमचा राईट हॅण्ड माणूस (परमबीर सिंह) होता असं सांगितलं.

तसंच अनिल देशमुख आणि परमबीर सिंह या दोघांचीही चौकशी झाली पाहिजे असं मत मे.सुप्रीम कोर्टाने नोंदवलं.
मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
या प्रकरणाची सी.बी.आय. चौकशीची मागणी करणारी याचिका त्यांनी मे.उच्च न्यायालयात केली होती.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT